लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.
Showing posts with label माझी कविता. Show all posts
Showing posts with label माझी कविता. Show all posts

Tuesday, 28 June 2022

पावसाळ्यातला चहा, पोहे अन् ती...

मुसळधार पावसात ती ॲक्टिव्हावरुन आली

रेनकोट अन् हेल्मेट काढत तिने केस मोकळे सोडले...

नाष्ता करताना मी पोह्यांकडे बघतच नव्हतो

तिने केस मोकळे सोडले आणि मी डोळे...

तिने पाहिलं, मी पाहिलं नजरेला नजर भिडताच माझी जरा फाटली

कारण, स्कूटी चालवणारा तिचा बाप माझ्याकडे बघत होता...

पोह्यांवर गरमा-गरम तर्री ओतली, तशी तिने स्माईल दिली

प्रत्येक घास खाताना तिला न्याहाळत होतो, तिही गुपचूप बघत होती...

तिच्या नादात पोह्यांत लिंबू पिळणंचं विसरलो, पोहे संपल्याचंही अचानकच कळलं

अजून थांबायचं म्हणून चहा मागवला, तेवढ्यात ऑफिसची शिफ्ट आठवली

मुसळधार पाऊस, थंडगार हवा, गरम चहा आणि ती...

हवंहवंस वातावरण, मस्त क्षण, त्यात अडकलेलं माझं मन

सगळं तिथंच सोडलं, पटकन ऑफिस गाठलं

पहिली बातमी करताना तिच आठवली, न राहून कविता लिहीली...

Thursday, 3 March 2022

तो जगतोय...

तो जगतोय,

कुणासाठी तरी का होईना तो जगात दिसतोय

अपेक्षांचा सुळका सर करताना दमछाक तर फार होते

जबाबदाऱ्यांचं अन् कर्तव्यांचं बिऱ्हाड वाहताना आपल्यांची उणीव फार होते

त्या उणीवेशीच आता घट्ट नातं बनलंय

या अनैतिक नात्यानं त्याला मात्र पूर्ण बदललयं

तरीही तो जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना झुरतो आहे


आवडती गाणी हल्ली हृदयाची तार छेडत नाही

सुंदर चेहरे पाहूनही हल्ली हृदय बावरत नाही

प्रेमाची भावना जास्त काळ साथ देत नाही

मैत्रीही सध्या जवळची वाटत नाही

असं वाटतं हृदयाचा दगड झालाय

मनातला भावी "तो" मेलाय

त्याच्या मनातला "तो" घायाळ झालाय

पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना लढतो आहे


पोट भरुन खा... असं ऐकायला तो आईजवळ नाही

दादा आम्हाला एक वहिनी आण असं चिडवणं ऐकायला तो बहिणीजवळ नाही

काळजी करु नको, मी आहे असं बापाकडून ऐकण्यासाठी तो वाटच पाहतोय

आईच्या हातची पोळी, भाजी, पोहे, चहा यासाठी तो रोजच तरसतोय

आईच्या वरण-भातापुढे त्याला बिर्याणाही फिकी वाटते

घरातल्या प्रत्येक क्षणांची त्याला लय खत वाटते

अनोळखी शहरात, अनोळखी लोकांत तो एकटाच फिरतोय

पण, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी का होईना प्रयत्न करतो आहे


तसा तो फुसका वाटला तरी कधीतरी तोही गागट करतो

स्वप्न त्याचीही आहेत, ध्येय त्याचीही आहेत

ती स्वप्न नेमकी कोणती हेच त्याला दिसत नसावं

त्यालाही वाटतं योग्य वाट दाखवणारं कुणीतरी त्याला मिळावं

भरकटलेल्या वाटेवर तो चालतचं जातोय

एका हातात कर्तव्य, दुसऱ्या हातात स्वप्न अन् डोक्यावर जबाबदारी

हा सगळा डोंबाऱ्याचा खेळ खेळत, आयुष्याच्या दोरीवर तो टिकण्याचा संघर्ष करतोय

अन्, तरीही तो अजून जगतो आहे, कुणासाठी तरी?....

कुणासाठी तरी कशाला, तो आपल्याच लोकांसाठी जगतोय

कुटुंबासाठी, मित्रांसाठी, स्वतःसाठी अन् स्वतःच्या स्वप्नांसाठी तो जगतोय...

तो जगणारच... आणि मोठा होऊन तो अक्षय होणारच...!

.

.

.

- अक्षय्यनामा✍️

Monday, 14 February 2022

नावं तिचं आठवण...


कॉलेजमध्ये असताना माझा स्वभाव भावनात्मक होता, आताही आहेच. मन कोमल होतं. पण, प्रेमात कधी चमकलचं नाही माझं भाग्य श्रीदेवीपेक्षाही सुंदर वाटायची ती. माझ्या डोळ्यातली तीच होती रोहिणी का असं केलं असेल तिने तिलाच माहीत. कधीकाळी आशेचा किरण दिसला होता, तोही आता प्रखर सूर्यप्रकाशात लुप्त झाला. बाकी वेळ मिळाला की, तिच्या सोबतच मनसोक्त बोलतो, नावं तिचं आठवण...

Monday, 17 May 2021

वादळ

 सोसाट्याचा वारा भयंकर वादळाचा इशारा देतो,

पण क्षणभर का होईना गारवा मात्र देतो...

आपल्या आयुष्यात अनेक वादळं येतात,

पण त्याआधी थोडा गारवा मात्र देतात...


याच क्षणभर मिळालेल्या गारव्यात तृप्त व्हायला हवं,

अन् मग पुढे येणाऱ्या वादळाशी लढायला हवं...

वादळ येईल, सर्व उध्वस्त करुन जाईल

आपण मात्र पुन्हा उठायला हवं,

स्वतःला सावरुन दुसऱ्यालाही उठवायला हवं...


वादळ कधी सारखं नसतं

ते रूप बदलून येत असतं

आपण त्याला घाबरायचं नसतं

मात्र स्वतःची काळजी घेऊन दुराऱ्याला वाचवायचं असतं...


महामारीच्या या वादळात स्वतःची काळजी घ्यायला हवी,

मात्र दुसऱ्यांचीही विचारपूस करायला हवी...


शक्य ती मदत करायला हवी,

अन् या भयंकर वादळात माणुसकीची ज्योत प्रज्वलित ठेवायला हवी...




Tuesday, 25 August 2020

प्रेम कसं होतं? एक आठवण...

     प्रेम कसं होतं?... २५ ऑगस्ट २०१७ ला ही कविता लिहिली होती. तेव्हा मी BMM च्या फर्स्ट ईअरला होतो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं अतिप्रेम झालं की ते प्रेम कागदावर उमटलं. कविता ज्यांना ज्यांना पाठवली सर्वानांच ती आवडली. त्याच वर्षी म्हणजे २०१७ ला मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. त्यात अनेक प्रसिद्ध कवींच्या कवितेचं वाचन करून त्यांना आदरांजली देण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर केल्या. यावेळी विज्ञान,कला वाणिज्य, पत्रकारिता अशा सर्व शाखेचे जवळपास २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या कवितेचं वाचन झालं. तेव्हा 'BMM मधून कोण नाही का कविता करणारा?'' असं सूत्रसंचालन करणाऱ्या दीपक गवादे सरांनी विचारलं. आम्ही सगळे जण एकमेकांची तोंडं पाहू लागलो. माझी कविता मित्रांना माहित होती. तेवढयात माझा वर्गमित्र प्रसादने नंदू सरांना सांगितलं कि सर अक्षयने लिहिली आहे कविता. मला जाम अवघडल्यासारखं झालं. कारण ती कविता प्रेमावर होती आणि मी इतका लाजरा... त्यात ती सर्वांसमोर वाचायची, सगळे हसणार, मजा घेणार याची मला भीती... नंदू सरांनी मला जा पुढे कविता वाच म्हणून हट्टाने आणि आदेशाने सांगितलं. मी घाबरत घाबरत माझ्या मोबाईलवर माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढे गेलो... दीपक सरांना विनंती केली कि,  सर मला कविता वाचता येणार नाही प्लीज तुम्हीच वाचा... असं सांगून मी माझा मोबाईल दीपक सरांकडे दिला आणि पटकन माझ्या बेंचवर बसलो. यावेळी माझ्या हृदयाचे ठोके भयंकर वाजत होते. कारण मी कुणावर प्रेम करतो हे या कवितेतून स्पष्ट कळत होतं. 
        तर दीपक सरांकडे मोबाईल दिला, त्यांनी माझ्या कवितेचं नाव वाचूनच कवितेचा आशय समजून घेतला. आणि जसं कवितेचं नाव वाचलं तसं सर्वजण ओ... म्हणून दाद देऊ लागले. दीपक सर भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि कवितेचं वाचन कौशल्य खरंच अप्रतिम आहे. जेव्हा दीपक सरांनी कवितेचं वाचन सुरु केलं तेव्हा प्रत्येक ओळीवर सर्वजण दाद देत होते, हसत होते, माझ्याकडे बघत होते आणि मी मात्र खूपच नर्व्हस होतो. कारण ती कविता म्हणजे तिला जाहीररीत्या प्रपोजच होता. बोल दीपक सरांचे आणि शब्द माझे. माझ्या कवितेचं रसग्रहण आणि सादरीकरण ज्याप्रकारे दीपक सरांनी केलं ते खूप अप्रतिम होत. प्रत्येकाला ही कविता रिलेट करत होती. थेट हृदयातून आलेल्या या कवितेत माझ्या १००% खऱ्या आणि निखळ भावना होत्या. कवितेच्या शेवटच्या कडव्यात एक ओळ होती ज्यामुळे सर्वजण खळखळून हसले ती ओळ अशी -  ''प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.'' बालिश वाटते ना? मलाही आता वाटते. पण तेव्हा हीच फीलिंग होती. आता कळतंय आपण किती बालिश होतो ते... पण काहीही असो जे वाटलं ते लिहिलं... माझ्या कवितेने कार्यक्रमाचा शेवट झाला. आणि निघताना मला सगळेजण दाद देत होते, तारीफ करत होते, अभिंनदन करत होते... मी फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरचे सिनिअर विदयार्थीं मला अभिनंदन करायला आले. दीपक सरांनी तर माझं कौतुक केलं. कारण पत्रकारितेचा विदयार्थी म्हणून माझा स्वतःचा ब्लॉग आहे आणि मी काहीतरी लिहितोय यामुळे त्यांनी मला शाबासकी दिली. सोबतच थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना ''शिका काहीतरी यांच्याकडून'' असं म्हणत त्यांना हटकलं. सरांनी केलेल्या कवितेच्या वाचनामुळे मला कॉलेजात जरा वेगळी ओळख मिळाली आणि मी काही दिवसांचा सेलेब्रिटी झालो होतो. पण.... 
       पण... जी कविता सर्वांनां आवडली, जी कविता मी तिला स्वतः पाठवली होती, त्याच मुलीने मला विचारलं... ''अक्षु, कुणासाठी लिहिलीय कविता?'' आईशप्पथ  काळजाची तार छेडणं काय असतं हे त्याक्षणी कळलं. नेमकं ती माझ्या बाजूला बसली होती. बाजूला म्हणजे मुलामुलींचे वेगळे बेंच होते आम्ही दोघे कडेला बसलो होतो, मध्ये गॅप होता. तिच्या बाजूला बसला यावं म्हणून मी मुद्दाम तिकडे बसलो होतो. पण साला तिला खरंच कळलं नाही का? कि ती कविता तिच्यासाठीच होती... कॉलेजात कसं काय टॉप केलं तिने काय माहित? वेडी कुठली... एकतर ती खूप वेडी होती, नाहीतर तिला सगळं कळत असूनही माझी शाळा घेत होती...असो... ते दिवसच वेगळे होते. या कवितेचं वाचन माझी मैत्रीण श्वेता वाळंजने सुद्धा केलाय. आम्ही कल्याणच्या जनशक्ती न्यूजमध्ये सोबत काम करायचो. तेव्हा तिलाही कविता खूप आवडली आणि तिने तर थेट तिच्याच फेसबुकवरून लाईव्ह करत कवितेचं वाचन केलं. त्या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही कविता हृदयाच्या खूप जवळ आहे. आज या कवितेला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जरा जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून ही कविता पुन्हा शेयर करतोय...कशी वाटली सांगा... जमलं तर...आता तर कविता सुचत नाही कारण आता तशा भावनाच येत नाही. त्यामुळे मी ज्या काही मोजक्या ४-५ कविता केल्या आहेत त्याच माझ्या हृदयातल्या आणि मनातल्या गोष्टी आहेत असं समजा...पुन्हा अशा कविता सुचतील कि नाही...माहित नाही. कारण आता प्रेम वैगेरे म्हटलं कि भीती वाटते. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि बाकी राहिली शून्य!!! पण बघू ,काय सांगता येत नाही. ये दिल तो बच्चा है जी...😊


मूळ कविता वाचण्यासाठी हृदयावर 💓💓💓💓 क्लिक करा


Monday, 9 March 2020

तू कोण आहेस...?

 तू कोण आहेस...?

कोण आहेस तू, जी ही सृष्टी निर्माण करते
कोण आहेस तू, जी नवा जीव निर्माण करते
कोण आहेस तू, जी नर-मादी दोघांनाही एकाच योनीतून जन्म देते
कोण आहेस तू, जी नऊ महिने एका जीवाला गर्भात वाढवते
कोण आहेस तू, जी आपल्या दुधानं परवरिश करते एका तानुल्ह्याची
तू एक स्त्री आहेस, तू आहेस निर्माता या मानव जातीची...


तू आई आहेस तू ताई आहेस
तू मैत्रीण आहेस तू प्रेयसी आहेस 
तुझ्याविना कशी चालणार ही सृष्टी
हे स्त्रीये तू नसती तर राहिली तरी असती का ही मानवजात
निसर्गानं तुलाच दिलंय वरदान, नवा जीव निर्माण करण्याचं
तू नसती तर कोणी चालवलं असतं हे जन्मचक्र
खरंच तू एक स्त्री आहेस, जगतजननी या सृष्टीची...


महामाया म्हणून तूच जन्म दिलास ना बुध्दाला
जिजाऊ म्हणून तूच घडवलं ना शिवाजीला
भिमाई म्हणून तूच घडवले बाबासाहेब
सावित्रबाईं बनून तूच साथ दिली महात्मा जोतिबाला
सगळ्यांना घडवण्यात - वाढवण्यात योगदान तुझंच
पुरुषाच्या बरोबरीनं नाही तर पुरुषाच्याही पुढं पाऊल तुझंच


तू भोळी आहेस तू प्रेमळ आहेस
तू साधी आहेस तू सरळ आहेस
पण जेव्हा कळेल तुला तुझ्यातलं सामर्थ्य
होशील तू  पुन्हा राणी झाशीची
होशील तू पुन्हा रझिया सुलतानाची
होशील तू नांगेली त्रावणकोरची
होशील तू फुलनदेवी या समाजाची


तू नेहमीच सिद्ध केलंय स्वतःला कर्तुत्वानं
कधी तू कल्पना बनून अंतराळात गेलीस
कधी तू पी. टी. उषा बनून सुसाट धावलीस
कधी तू लता बनून भारताची कोकिळा झालीस
कधी तू नयनतारा बनून साहित्यिक झालीस
कधी तू इंदिरा बनून प्राईम मिनस्टर झालीस
कधी तू प्रतिभा बनून राष्ट्रपती झालीस
तू सोनिया झालीस तू जयललिता झालीस
तू ममता झालीस तू मायावती झालीस
तू किरण बेदी झालीस तू मीरा बोरवणकर झालीस
तू सर्वकाही जिंकून घेतलंस तुझ्या जिद्दीनं


पुन्हा एकदा आरशात बघ स्वतःला
किती सुंदर आहेस तू, पण त्याहूनही कशी सामर्थ्यवान आहेस तू
बघ एकदा तुझ्यातल्या सामर्थ्याला
बघ एकदा तुझ्यातल्या प्रतिभेला
एकदा आजमावून बघ तुझ्या ताकदीला
एकदा सादर कर तुझ्या कलेला
होऊन जाऊदे एकदा या पुरुषसत्ताक व्यवस्थेशी युद्ध
मग कळेल त्या व्यवस्थेलाही काय असतं एका स्त्रीचं बंड


तू लढतेस तुझ्या अस्तित्वाची लढाई
पण तूच नसेल तर राहील का पुरुषाचं तरी अस्तित्व
तुझ्याकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचे तू डोळेच फोड
वाईट स्पर्श करणाऱ्याचे तू हातपाय मोड
तू ठरवलंस तर आत्तापासूनच सुरुवात होईल बदलाची
तू ठरवलंस तर उद्याच नष्ट होईल सत्ता पुरुषाची
एकदा फक्त स्वतःला विचार तू कोण आहेस
नेमकं उत्तर मिळेल तू एक पराक्रमी स्त्री आहेस


तुझ्या स्त्रीत्वाला सलाम
तुझ्या कर्तुत्वाला सलाम
तुझ्यातल्या आई पासून आजी पर्यंतच्या सर्व पात्रांना सलाम
तुझ्या त्यागाला सलाम...
विसरू नकोस फक्त, कि तू कोण आहेस,
सांग ठणकावून जगाला, मी एक स्त्री आहे
मी एक स्त्री आहे...
.
.
.
#अक्षय्यनामा✍️



#internationalwomensday #mentoring  #debate #womensupportwomen #w4w #networking #inspo #womeninleadership #genderparity #genderequality #everybodysbusiness #letstalk #equality #diversity #changethestory #herstory #equalityforeveryone #balancedworld #empowerment #equalpay #womenunite ⁣#2020

Saturday, 9 November 2019

गावाकडची रात्र

गावाकडची रात्र

हाताने विणलेली लाकडी चारपाई 
त्यावर पांघरलेली कापसाची मऊ गादी
हातानेच बनवलेली गोधडी अन् उशी
सर्व अंथरूण असे जणू काही बाळाची झोळी....


या झोळीत टाकूनी अंग मीही होतो चिमुकले बाळ
राहत असलो शहरात तरी कशी तुटेल गावाकडची नाळ
झोळीत झोपलेल्या मज मोठ्या बाळाला नाद या गावाचा
आभाळाची चादर, चंद्राचा मंद प्रकाश, रातराणीचा सुगंध
झाडांतून जन्मलेली शुद्ध थंड वाहणारी हवा एसीलाही लाजवते
मला मात्र लहान बाळाप्रमाणे अगदी साखर-झोपेत निजवते....


गावाकडची ही शांत रात्र गोंधळलेले मनही शांत करते
शहरात राहिलेली अपूर्ण झोप गावात येवून पूर्ण होते
घराच्या अंगणातल्या चारपाईवर टाकून अंग मी बघतो त्या चंद्राला
त्याच्या त्या मंद प्रकाशने झोप येते जणू चिमुकल्या बाळाला
रातराणीच्या फुलांचा सुगंध एक वेगळीच भूल देतो
थंड झालेल्या वातावरणात जणू काही अत्तर शिंपडतो....


शांत अन् थंड वातावरणात रातकिडा किर्र - किर्र करतो
नंदीच्या गळ्यातील घंटा ही अधून - मधून सौम्य असे संगीत देते
शहराच्या तुलनेत गावाकडची रात्र निरोगी अन् सुखकर असते
पण ही गावातली रात्र प्रत्येकाच्याच नशिबी नसते...


अशी ही गावाकडची रात्र खूप वर्षांनी मिळाली
आज मन भरून आभाळात पहायचं आहे त्या चंद्राला लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांशी गप्पा मारायच्या आहे
या सुंदर गावातील सुंदर रात्रीत गाढ झोप घ्यायची आहे....


शहरातल्या प्रत्येकाने एकदा गावाकडची रात्र अनुभवावी
गावाकडे येऊन अंगणात चारपाई टाकून एक झोप घ्यावी
चंद्र,चांदणी,रातराणी यांचा एकत्रित आस्वाद घेऊन काही क्षण विश्रांती घ्यावी....!



click for social media contacts:





https://m.facebook.com/story.php?story_fbid=2580932481994315&id=100002327668023

#अक्षय्यनामा #गावाकडच्या_गोष्टी #मनातल्या_गोष्टी #परसामळ #शिंदखेडा #धुळे #शिघ्रकविता #साखरझोप #goodnight

Monday, 19 August 2019

माझा स्वाभिमान... भारतीय संविधान!!!

हा एकच ग्रंथ आहे जो भारताला एकसंघ आणि मजबूत ठेवू शकेल. 



संविधान नाही तर भारतवर्ष नाही
संविधान नाही तर लोकशाही नाही
संविधान नाही तर न्याय नाही
संविधान नाही तर समता नाही
संविधान नाही तर समभाव नाही
संविधान नाही तर देशप्रेम नाही
संविधान नाही तर स्वराज्य नाही
संविधान नाही तर मूलभूत हक्‍क नाही
संविधान नाही तर प्रगती नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय सुरक्षा नाही
संविधान नाही तर राष्ट्रीय एकता नाही
संविधान नाही तर शिक्षण नाही
संविधान नाही तर सामाजिक, आर्थिक राजकीय प्रगती नाही
संविधान नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही
संविधान नाही तर देशांतर्गत शांतता नाही
संविधान नाही तर सामान्य जनतेला अधिकार नाही
संविधान नाही तर लोकशाही,लोकराज्य,समता, स्वातंत्र्य, न्याय,एकात्मता,बंधुता, माणुसकी आणि देशही...असं काहीच राहणार नाही.

म्हणून संविधानाला धोका असणाऱ्या शक्तींना वेळीच आवरा. संविधान वाचवा आणि सुरक्षित व सुशिक्षित हाती द्या.

#माझा_स्वाभिमान_भारतीय_संविधान
#लोकशाहीचा_विजय_असो
#जय_संविधान



Sunday, 11 August 2019

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!

महापुरातला प्रवास...मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!


पावसाळा आला, पाऊस सुरू झाला
मेघ गरजले, वीजा कडाडल्या
आधी मुंबईची तुंबई झाली
लाईफ लाईन सगळी पाण्याखाली गेली
मुंबईचा प्रथम नागरिक म्हणाला पूर आलाच नाही
कारण त्याचा मुलगा गटारात पडून हरवला नाही...

लोक ढिगाऱ्याखाली दबून मेले, कुणी मॅनहोल मध्ये गडप झाले
भर पावसातही अश्रू अनावर झाले, सरकार मात्र झोपेतच राहिले
कोल्हापूरची महालक्ष्मी मी 14 तास पुरात अडकली
प्रशासनाला  मात्र उशिराने जाग आली
स्थानिकांनी माणुसकी दाखवली म्हणून एक्सप्रेस पुरातून सुटली...

दरवर्षी मुंबापुरीची तुंबापुरी होते, पण जनता याला फक्त नैसर्गिक आपत्तीच समजते
मग मुंबईकरांचा तथाकथित मुंबई स्पिरीट जागा होतो, 
अन् सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाकडे तो सहज कानाडोळा करतो 
मुंबईकरांच्या ह्याच भोळेपणाचा फायदा सत्ताधारी घेतो
म्हणूनच काहीही झालं तरी पुन्हा तोच निवडून येतो...

मुंबईकरांना असले अंध स्पिरीट महाग पडणार आहे,
नेत्यांना काही फरक नाही, ते त्यांच्या महालात सुरक्षित राहणार आहे
दररोज मरणयातना सहन करत मुंबईकर पुन्हा उभा राहणार आहे
आमची मुंबई - आमची मुंबई करत तो स्वतः मात्र मुंबईतूनच हद्दपार होणार आहे
कारण तो त्याच लोकांना निवडून देणार आहे,
जे अनेक वर्षे सत्तेत राहूनही मुंबईकरांना गृहितच धरणार आहे...

असो... यंदाही मुंबईने कसाबसा पावसाळा सहन केला
पण अर्धा महाराष्ट्र मात्र महापुराने वेढला गेला.
कोकण, रायगड,सातारा, सांगली, कोल्हापूर.. सगळीकडे पूरच पूर...

अनेक जीव जात होते, संसार उध्वस्त होत होते 
आपले मुख्यमंत्री महोदय मात्र महाजनादेश यात्रा करत होते
जलसंपदा मंत्री पूर पर्यटन करत होते, सेल्फी काढत होते
महापुराचा आढावा सोडा ते तर नौकाविहार करत होते...

पूर परिस्थिती हाताबाहेर गेली, मग राज्याच्या राजाला जाग आली
राजाने हवेतूनच पूर बघितला, त्याच्या पायाला पाण्याचा साधा स्पर्शही नाही झाला
देशातल्या प्रत्येक राज्याच्या मदतीला माझा महाराष्ट्र धावून गेला,
पण आज शेजारचा कर्नाटकही आपल्या मदतीसाठी उदासिन झाला
महाराष्ट्र जणू पोरकाच झाला 
केंद्र आणि राज्य दोघांसाठी परका झाला....

राज्यात आलेला महापूर सत्ताधार्यांसाठी प्रचाराचा नवा मार्ग ठरला
मोफत गहू - तांदूळ देऊन त्यावर पक्षाचा शिक्का मात्र मारला.
पुरात मरण पावलेल्या आई - बाळाच्या मृतदेहासमोर माध्यमांना प्रतिक्रिया देणारे असंवेदनशील नेतेही दिसले,
पूरग्रस्तांच्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसणारे खलनायकही दिसले....

अंध-अपंग,बहिऱ्या सरकारला माध्यमांनी अखेर जागे केले.
कर्तव्य बजावताना सांगलीच्या कुलदीप मानेला अश्रू मात्र अनावर झाले
अर्धा महाराष्ट्र बुडत होता, रडत होता, मरत होता आणि पंतप्रधान मात्र 370 च्या नावाखाली देशाला संबोधन करत होता.
सगळीकडे अंधार, निराशा आणि उध्वस्त झालेला संसार...
असा माझा महाराष्ट्र संघर्ष करत होता... 
जाती-पाती भांडण-तंटे सर्व काही सोडून एकत्र येण्याचे आवाहन करत होता...

अशात एक "माणूस" नावाचा नायक मदतीला धावून आला
माणसाचं शरीर असलेल्या त्या नायकातून जणू देवच बाहेर आला.
माणुसकीचं शस्त्र काढून त्या नायकाने केला संकटांवर प्रहार
पूरग्रस्तांना झाला जणू देवाचाच साक्षात्कार...

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, गिरिजाघर सगळेच देव बुडले होते
पण वर्दीतले देव मात्र सर्वांनाच वाचवत होते.
माणुसकी या एकाच धर्माचे ते सर्व देव होते
कारण ते भारतीय जवान होते.
माणूस असो वा प्राणी सर्वांनाच ते वाचवत होते, 
स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटाशी ते लढत होते....

जवानाच्या पाया पडणारी बोटीवरची ती स्त्री असो,
जवानांचे औक्षण करणारी माता असो,
व्हीलचेअरवरची अपंग आजी असो, 
हृदयरुग्ण असलेले आजोबा असो,
बोटीवरचे ते हसणारे बाळ असो,
आठ महिन्यांची गरोदर महिला असो,
माकड असो, कुत्रा असो, गाय, म्हैस किंवा मांजर असो
या सर्वांनाच जीवनदान देणारे लोक माणुसकीचे खरे दूत होते
कारण, ते भारतीय जवान होते....

या महापुरात एक गोष्ट मात्र चांगली झाली,
जात-पात ही जणू पुरात वाहूनच गेली.
माणुसकीचा पुन्हा नवजन्म झाला,
माझा महाराष्ट्र खूप दिवसांनी पुन्हा पुरोगामी दिसला.
हिंदू मशिदीत जेवला, मुस्लिम मंदिरात जेवला, 
सर्व धर्मियांनी विहारात आसरा घेतला, श्रीमंत - गरीब एकाच जागी राहिला....

अनेक संकटे आली महाराष्ट्रावर... या महाराष्ट्राची मान कधी झुकू देणार नाही...
माणसं आहोत आम्ही, माणुसकी कधी मरू देणार नाही...
असेल वेगळी आमची जात, धर्म, पंथ, नेते व  विचारसरणी,
पण आज कळलं संकटाच्या वेळी कामी फक्त येते माणुसकी....

या महापुरातून महाराष्ट्र सावरेल याची मला खात्री आहे.
पण येथे जन्मलेल्या माणुसकीच्या संगोपनाची जबाबदारीही आपलीच आहे!!!

शपथ घेतो शिवरायाची,
शपथ घेतो महाराष्ट्राची,
शपथ घेतो फुले, शाहू, आंबेडकरांची...
शपथ घेतो महाराष्ट्र धर्माची,
शपथ घेतो भारतीयत्वाची,
आणि शपथ घेतो माणुसकीची...
माणूस आहे माणसासारखाच वागणार.
मानवधर्म जपणार, मानवधर्म वाढवणार....

असेल मी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, ख्रिश्चन, मराठा, बौद्ध, 
महार, मातंग, साळी, माळी, कोळी, आगरी, न्हावी, शिंपी, आदिवासी किंवा अजून काही....
पण मी प्रथम भारतीय आहे... आणि एक मानव आहे...
कारण मी पाहिलं आहे त्या  वर्दीतल्या देवांना...
जे कोणत्या जातीचे -  होते ते मलाही माहीत नाही.
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे रक्ताची नाती नसतानाही मदत करत होते
मी पाहिलं आहे त्या तरुणांना, जे आपल्या पूर्ण शक्तीने समाजकार्य करत होते 
मी पाहिलं आहे त्या माणसांना, जे देवापेक्षा मोठं काम करत होते.
माणुसकी ही ईश्वरसेवा, माणुसकी हा धर्म, माणुसकी हे परम कर्त्यव्य
माणुसकी ही राष्ट्रभक्ती, माणुसकी ही सेवा...

माणूस आहे माणसाप्रमाणेच वागणार,
स्वतःच्या बुद्धीचा आणि आत्म्याचा आवाज आता मीही ऐकणार...
माणुसकीसाठी, महाराष्ट्रासाठी, लोकशाहीसाठी ,स्वतःसाठी मला माझा योग्य राजा निवडायचा आहे!!!

आता नको मला दुष्काळ,
नको महापूर, 
नको बेरोजगारी,
नको जातीयवाद,
नको मुस्कटदाबी,
नको हिटलरशाही...

मला हवी लोकशाही...
मला हवं स्वराज्य,
मला हवी स्वच्छ हवा,पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,नोकरी
मला हवं संवेदनशील प्रशासन... आणि जाणता राजा!!!
 
यासाठी लढण्याची तयारी हवी,
एकाला दुसऱ्याची अन् दुसऱ्याला तिसऱ्याची साथ हवी.
यशस्वी होईल लोकशाही, नांदेल पुन्हा माणुसकी,
जेव्हा - जेव्हा आयुष्यात येईल प्रवास महापुरातला...
मुंबई व्हाया महाराष्ट्र टू माणुसकी!!!



click for social media contacts:








Tuesday, 2 April 2019

The feelings of Teddy....

     इस टेडीबियर को किसी ने फेंक दिया था... अगर उसमें भावनाएं होती हो उसे कैसा लगता? इसे समझाने के लिए मेरी लिखी एक हुई छोटिसी काल्पनिक कहानी... उम्मीद है आपको पसंद आएगी...😊

Photo: 2nd April 2019, Opp. SST College' fountain
   
     बाजार से उसने मुझे बड़े प्यार से घर लाया। मेरे लिए एक अच्छी सी जगह अपने कमरे  दी। वह मेरे साथ बहुत खेलती थी, मुझसे बातें करती थी और मैं बस खामोश रहकर उसकी बातें सुनता था। मैं उसको कुछ जवाब तो नहीं दे पाता था लेकिन उसको पूरी तरह से महसूस करता था। वह मुझे प्यार से मारती थी मुझे उठाकर पटकती थी मुझे बहुत सताती थी लेकिन बाद में प्यार भी करती थी। और मैं बस उसके प्यार में सब कुछ हंसी खुशी बर्दाश्त करता जाता था। भले ही मेरे में जान नहीं थी, पर इतने दिन साथ रहकर ना जाने कहां से मेरे दिल में उसके लिए प्यार जाग गया। लेकिन क्या करता हूं तो मैं एक खिलौना ही ना। लेकिन फिर मैंने सोचा ठीक है मैं खिलौना हूं, मैं उससे प्यार नहीं कर सकता लेकिन वह तो मुझसे बेइंतहा मोहब्बत करती है। मेरा साथ कभी नहीं छोड़ेगी बस यही सोच कर उसे उसके हमसफर के साथ देख कर मैं अकेला जिए जा रहा था।
     एक दिन अचानक उसको क्या हुआ मुझे पता ही नहीं चला। उसने यह कहकर मुझे कचरे के डब्बे में फेंक दिया कि अब या खिलौना पुराना हो चुका है इसकी हमें कोई जरूरत नहीं। उसकी यह बातें सुनकर मुझे बहुत बड़ा सदमा लगा। की क्या यह वही लड़की है जो मुझसे घंटों तक अकेले में बातें करती थी, जो मुझे गोद में लेकर सोती थी, जो मुझसे सबसे ज्यादा प्यार करती थी, जो मुझसे सारी बातें साझा करती थी, मेरे साथ अपना सुख- दुःख बाटती थी, जो हमेशा मुझे साथ लेकर जाती थी। आज न जाने उसे क्या हो गया की उसने मुझे अपने से इतना दूर कर दिया।
    मैं उससे मैं कह नहीं सकता की मुझे अपने से दूर ना करना भले मुझे किसी कोने में रख देना लेकिन तुम्हारे बगैर मैं जी नहीं सकता। काश काश भगवान इस रूई के खिलौने में कुछ देर के लिए जान भर दे और मैं उसे कह सकू की, मुझे अपने से दूर मत करना। लेकिन मैं कमबख्त मै हूं तो एक निष्प्राण खिलौना, मुझ में इतनी भी शक्ति नहीं कि अपने दुख को व्यक्त करने के लिए आंसू बहा सकू। उसने मुझसे पहले बेइंतहा मोहब्बत की फिर मैं भी उसको अपना दिल दे बैठाऔर अब उसने एक झटके में मुझे अपने से दूर कर दिया। अब मेरे जीने का कोई मतलब नहीं रहा जिसको मैं अपना जीवन समझ रहा था उसी ने मुझे ठुकराया। लेकिन कमबख्त मुझ में इतनी शक्ति भी नहीं कि मैं आत्महत्या कर सकू।   अभी फिलहाल दो दिन से में किसी तालाब में यूहीं पड़ा हूं। ना ठीक से जी पा रहा हूं और ना ही मर रहा हूं बस यूं ही उसकी याद में तड़प रहा हूं। सब कुछ खत्म हो गया है बस एक बार उसे देख कर ना जीवन समाप्त करना चाहता हूं।जाते जाते मैं बस इसी सोच में पड़ा हूं की,  ख़ुदा ने इंसान को बनाया और इंसान ने मुझे बनाया। मुझमें तो प्यार की भावनाएं जाग उठी लेकिन इंसान की भावनाएं क्यों मर रही है। अगर इंसान ऐसा ही होता है तो में शुक्रियादा करता हूं उस खुदा का जिसने मुझमें प्राण नहीं दिए। बस अब उसी ख़ुदा से यही दुआ है कि मेरे अंदर के भावनाओं को भी यमराज के पास बुला ले। क्योंकि जब तक मेरे दिल में लिए प्यार है तब तक मैं ऐसेही तड़पता रहूंगा लेकिन मेरा रूई का बदन देखकर किसी को मेरी तड़प भी नहीं दिखाई देगी।
    ऐ ख़ुदा मुझपे एहसान कर और अपने फरिश्तों को भेजकर मुझे अपने पास बुला ले। और उस लड़की को कुछ मत कहना क्योंकि उसके साथ बिताए हुए वह पल इतने हसीन थे कि मैं वह कभी नहीं भूल सकता। उसे लंबी उमर देना उसे खुश रखना बस यही दुआ है मेरी कि वह जहां भी जाए हमेशा बस मुस्कुराती रहें।
                           - तुम्हारा Teddy🐻

Friday, 11 May 2018

कुणावरतरी प्रेम होणं... आणि ती व्यक्ती आपल्याला नकारच देणार हे माहित असूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करणं...अजबच असते ना ही भावना....

काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



हल्ली खूप बदललोय मी...
स्वतःच जणू स्वतःला विसरलोय मी...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
तुझं बोलणं, तुझं वागणं सर्वच मला आवडू लागलंय...
तुला काही फरक नाही पण माझंच सर्व बिनसलंय...
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                              
                  

तुझं माझ्यापेक्षा इतरांशी जास्त बोलणं...       मला         बघूनही न बघितल्यासारखं करणं...
हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरतंय...
पण काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



तुला मान्य नाही आपलं हे नातं...
हे मला केव्हाच कळलंय...
पण तरीही तुझ्यासाठी हे हृदय खुपवेळा रडलंय...
सर्व काही कळतंय पण  वळत नाही...
तूच सांग...काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
                                                                                            
 
 तुझ्याशी नातं जोडता-जोडता स्वतःचचं स्वतःशी नातं तुटलंय...तुझं प्रेम मिळवता-मिळवता मी स्वतःलाच गमावून बसलोय...कारण, काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!                        



तू मला स्पष्टपणे नाकरलंय...
अन मीही हे कटू सत्य स्वीकारलंय...
पण तरीही काय माहीत अधून-मधून हे  प्रेम कसं उतू जातं?...
असंच असतं का गं....हे एकतर्फी प्रेमाचं नातं?...
तुला नाही फरक पडला काही...पण मला हे सर्व कठीण जातंय... आता  तूच सांग... काय करू?
तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!
काय करू? तुझ्या प्रेमात जे पडलोय!!!



                                                       -अक्षय बैसाणे.







Monday, 12 February 2018

आपल्या जवळची आणि आपल्याला आवडणारी आपली खास मैत्रीण जेव्हा आपल्यावर रुसते आणि अक्षरशः आपल्याशी बोलणंच बंद करून टाकते... तेव्हा मनाला काय वेदना होत असतील हे मैत्री जाणणाऱ्या तिच्या म्हणजेच रुसलेल्या मुलीच्या खऱ्या मित्रालाच कळेल...एका रुसलेल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काही ओळी सुचल्या त्याच इथे लिहिल्या.. तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी एखादी मस्करी केल्यानंतर ती रुसली असेल तर तिला मनवण्यासाठी तुम्ही माझी कविता वापरू शकता... फक्त माझा ब्लॉग प्रामाणिकपणे तुमच्या फेसबुकआणि व्हाटसअॅपवर शेअर करा...आणि एक महत्वाचा प्रश्न स्वतःला विचारा- ती तुमची नक्की मैत्रीणच आहे ना? कि अजून काही?.....माझी कविता खूपच लहान पण अर्थपूर्ण आणि परिणामकारक आहे... ती आता पुन्हा बोलायला लागली....आणि लक्षात ठेवा कवितेत भावना फार महत्वाची...😉


तिच्याशी छोटीशी मस्करी केली,
अन् तिने माझ्याशी मैत्रीच् तोडली,

माझीच सवय मलाच नडली,

मला चांगलीच अद्दल घडली,
अशी ती अप्रिय घटना घडली,

तेव्हा मला अक्कल आली,

तिने मैत्री तोडून माझीच थट्टा केली,

माझ्या काळजाची तार अशी छेडली,

 Dear,

नाही करणार पुन्हा अशी चुकी,

मनापासून माफी मागतो तुझी,

पण मला पुन्हा हवी मैत्री  तुझी...



                    -अक्षय बैसाणे, तिचा वेडा... मित्र?

Saturday, 10 February 2018

मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन समजली जाते... परंतु त्याच लाईफलाईन मधून प्रवास करताना काय मरण यातना होतात हे केवळ दररोज ट्रेन ने प्रवास करणारा मुंबईकरच सांगू शकेल... २००६ चा साखळी बॉम्बस्फोट असो किंवा , ३० सप्टेंबर २०१७ रोजी झालेली चेंगरा-चेंगरी ची दुर्घटना असो... प्रत्येकवेळी मरतोय तो फक्त सामान्य माणूस आणि हा मुंबईकर... ट्रेन मधील यातना मी स्वतः रोज अनुभवतो... त्यामुळे याबद्दल मनातली गोष्ट मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे... आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या...

कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो... 


रोज पहाटे  मी पाच वाजता उठतो          तयारी करून धावत-पळत स्टेशन गाठतो
गच्च भरलेल्या डब्यात  मी जिद्दीने शिरतो                 
अन इथूनच माझा दम कोंडायला लागतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



ट्रेन मध्ये मी नेहमी उभाच असतो
पाय ठेवायला थोडीशी जागा शोधत असतो
खांद्यावरच्या बॅगेसोबत स्वतःला मी सांभाळत  असतो         
अन धक्के-बुक्के खात मी सर्वकाही झेलत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...  

                                                       
गर्दीच्या दाबामुळे छातीवर भासते कितीतरी किलोचे वजन      स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुद्धा संघर्ष करतो प्रत्येक जण
एकीकडे चालू असते भजन
तर दुसरीकडे माझ्या आयुष्याचं किर्तन
हे सर्वकाही मी निमूटपणे सहन करत असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


कधी उशीर झाल्यावर माझ्यावर येते दरवाजाला लटकण्याची बारी
तेव्हा भीती वाटते आजच तर नाही ना जाणार मी देवाघरी
या भीतीपोटी मला नेहमी आठवते माझी आई, जी मला म्हणत असते बाळा करू नकोस एवढी घाई
पण मी रोजच घाई करत असतो
कारण,  मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...


प्रवासात ट्रेन अचानक मध्येच कुठंतरी थांबते 
तेव्हा इच्छित स्थळी जाण्याची वेळही लांबते
मग लक्ष त्या लाल सिग्नल कडे जाते
जो पिवळा होण्याची सर्वच पब्लिक वाट पाहते
पण हा सगळा खेळ नेहमीचाच असतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



प्रवास करताना अचानक कुणाचातरी तोल जातो   अपघातात तो लंगडा-पांगळा होतो, नंतर तो  संपून जातो
रोज दिसणारा तो अनोळखी चेहरा अचानक गायब होतो
सामान्य माणूस रोज-रोज असाच मरतो
अन् सरकार नावाचा प्रेक्षक फक्त गंमत बघतो
हा क्रम नेहमी असाच चालू रहातो
कारण, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत  असतो...        
      

महिनाभर कष्ट करून पगार मी घेतो
पण एखादा चोर खिशातला पगार चोरतो                        
काय सांगू तेव्हा जीव खूपच तळमळतो
चोर निघून जातो अन् मी स्टेशन वर  एकटाच रडत बसतो
कारण,
मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...



अजूनही आठवतो तो २००६ चा साखळी बॉम्बस्फोट
ज्याने घेतला होता अनेक निष्पापांच्या नरडीचा घोट
अनेक तान्हुल्यांनी गमावले होते आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाचे बोट
स्फोटाच्या त्या आगीत लुप्त झाले ते हसणारे ओठ
स्फोटाचा हा राक्षस फारच भयंकर असतो
आणि, मी मुंबईकर रोज ट्रेन ने प्रवास करत असतो...




लिहिण्यासारखं खूप काही आहे पण संपू लागलयं माझ्या वहीचं पान 
अन लिहिता- लिहिता सारखंच हरपतोय मी माझं भान
डोळ्यातील अश्रू पडू लागलेयत माझ्या कवितेवर
पण हे अश्रू देखील नाही पुसू शकणार या दुःखद आठवणी.



हे सर्व विसरण्याचा  मी नेहमीच प्रयत्न करतोय
सगळं काही चांगलं होण्याची मी नेहमीच वाट बघतोय
ट्रेनप्रमानेच मीही पुन्हा गतीमान होण्याचा प्रयत्न करतोय
आणि मी मुंबईकर पुन्हा एकदा ट्रेन ने प्रवास करतोय........





 - अक्षय बैसाणे,एक सामान्य मुंबईकर....

Monday, 29 January 2018

मानवी मन ही जगातील सर्वात वेगवान वस्तू असली तरी, ते मन जेव्हा कुणाच्या तरी जाळ्यात अडकतं, तेव्हा ती व्यक्ती खूप बेचैन होते. मन हे मानवी स्वभावावर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळे मनाला कुणाच्याही जाळ्यात न अडकण्याचा व जपून राहण्याचा सल्ला या काही ओळींमधून देण्यात आलेला आहे. (१४ आॅगस्ट २०१६, रविवार मध्यरात्री ०१:५४ वाजता पूर्ण लिहून झाली).

हे वेड्या मना ...

 हे मन कसं वेडं असतं ना, कुठेही लगेच अडकतं
कुणाच्याही मोह-मायेत पटकन फसतं 
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
       हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...     
                         तु आहेस खूप भोळा, दुनिया खूप निर्दयी
काचेप्रमाणे होतील तुझे असंख्य तुकडे
आणि पडशील तू जमिनीवर आडवा
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
  हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...
झालंय काय तुला?
तु करतोयस काय?
कुठे आहेस तू नक्की?
तुझं चाललंय तरी काय?
 अडकशील तू जाळ्यात जरा सांभाळून रहा
काळजी घे स्वतःची जप स्वतःला
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला
हे वेड्या मना सांभाळ स्वतःला...


                                        -अक्षय बैसाणे.

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...