लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Friday 25 August 2017

प्रेम कसं होतं?



प्रेम कसं होतं?


 आयुष्यात तिला पहिल्यांदाच पाहिल्यावर जेव्हा हृदय धड-धडतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा तिचं नाव ऐकुणच चेहऱ्यावर स्मितहास्य येतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा बोलताना आपोआप तिचचं नाव आपल्या तोंडून निघतं तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा तिच्या कोमल हातांचा स्पर्श आपल्याला होतो तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा कारण नसतानाही उगाच तिची काळजी वाटते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती स्वतःहून आपल्याशी बोलायला येते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती तिचं मन आपल्याजवळ हलकं करते तेव्हा प्रेम होतं. 



जेव्हा ती आपल्यावर  उगाच ओरडत नि भांडत असते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती आपलं छानसं आणि गोड नाव ठेवते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा ती सर्वांसमोर आपल्यालाच हाक मारते तेव्हा प्रेम होतं.
जेव्हा लेक्चरला असताना पुस्तकात तिचं नाव येत आणि सगळे आपल्याकडेच बघतात तेव्हा प्रेम होतं.

जेव्हा ती कारण नसतानाही आपल्याशी बोलायला येते तेव्हा प्रेम होतं.
प्रेम
प्रेम
प्रेम.
प्रेम, हे असचं होतं. त्याला नसते काळ-वेळ, नसतं कसलचं बंधन. नसतात कुठलेही नियम व अटी, आणि नसतात कुठल्याही जाती-पाती. प्रेमात सर्व काही माफ असतं, आरशासारखं साफ असतं.


         
  प्रेम म्हणजे दोघांनाही जिवंतपणी मिळालेलं स्वर्ग असतं.प्रेम म्हणजे दोघांनाही एकाच वेळी एकसारखं पडलेलं गोड स्वप्न असतं.
प्रेम म्हणजे नोबिता-शिजुका सारखं जोडपं
असतं ज्यांच्या भांडनातही गोडपन असतं.
प्रेम म्हणजे दोन ह्रदय नि एकच जीव
प्रेम म्हणजे दोन शरीर नि एकच आत्मा
असं असतं प्रेम.........



-अक्षय बैसाणे.   

पहिली पोस्ट

  

 नमस्कार मी अक्षय बैसाणे. राहणार--कल्याण(पूर्व) जिल्हा ठाणे-४२१३०६. वय २२ वर्षे. मी SYBMM ला शिकत असून. मी एका स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार म्हणून नोकरीही करतो. ब्लॉग लिहिण्याचं कारण असं कि, मी माझ्या मनातील भावनांना शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देऊ इच्छितो. बरेच जण बोलतात कि तू खूप छान लिहितोस, ब्लॉग लिहायला चालू कर. मी कितपत चांगलं लिहितो हे मला माहित नाही पण कुठंतरी आपलं तोडकं-मोडकं लिखाण जतन करावं जेणेकरून मला माझं लिखाण वाचून माझी पात्रता कळेल आणि सोबतच त्यात मी सुधारणा करू शकेल हा प्रामाणिक उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून मी हा ब्लॉग सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मन आणि वेळ यांचा समतोल राखून मी ब्लॉगवर पोस्ट टाकत जाणार आहे, त्यामुळे पोस्ट कोणती,कधी, किती,कशी टाकणार याविषयी मीही अनभिज्ञच आहे. पण एवढं मात्र मी खात्रीशीर सांगू शकतो कि माझ्या ब्लॉगवरच्या पोस्ट वाचून मी तुम्हाला आपलासा वाटेल. तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्या लिखाणात तुम्हाला दिसेल. म्हणूनच या ब्लॉगवरील पेज च नाव मी ''मनातल्या गोष्टी'' असं ठेवलंय. 
   या पेजवर मी माझ्या आणि माझ्या आजूबाजूला घडत असणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल थोडं बोलणार असून त्याबद्दल मी माझं मतही मांडणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियाही माझ्या ब्लॉगवर स्वागताहार्य आहेत, त्यामुळे जास्तीत- जास्त प्रतिक्रियांची मला अपेक्षा आहे.(चांगल्या आणि वाईट दोन्हीही) आपणांस आग्रहाची विनंती आहे कि माझ्या पोस्टवर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात. सध्या तरी मी माझी पहिली पोस्ट म्हणून मी लिहिलेली एक कविता ''प्रेम कसं होतं''  आपल्यासमोर प्रसिद्ध करत आहे. मी कवी नाही पण ते म्हणतात  ना 'भावना महत्वाच्या असतात' म्हणून मी माझ्या मनातील भावना लेखणीच्या माध्यमातून कागदावर उमटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्यामुळे यमक जुळाले नाही तरी भावना मात्र कळतील.एकूणच या पेजवर तुम्हाला कथा-कविता, विवध विषयांवर लेख-अग्रलेख,ज्ञान-विज्ञान,माहिती-मनोरंजन हे सर्वकाही मिळणार आहे.
   चला  तर मग भेटूयात आपल्या हक्काच्या ब्लॉगवर www.akshaybaisane.blogspot.in वर क्लिक करा.
                                                                                         -अक्षय बैसाणे.

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...