लेटेस्ट

नमस्कार!!! प्रिय वाचकांनो... माझा ब्लाॅग तुम्हाला आवडत असल्यास कृपया नक्की फाॅलो, लाईक आणि शेयर करा. - तुमचा मित्र अक्षय बैसाणे.

Monday 29 April 2019

मतदान कुणाला आणि का करावे? यावर मी दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजी फेसबुकवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला होता. तोच आज मतदान दिनाच्या निमित्ताने पुनःप्रकाशित करतोय. आपल्या हक्काच्या ब्लॉगवर... आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी २९-०४-२०१९ ला मतदान होत आहे. मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य नक्की पार पाडा.

VBA, CONGRESS आणि  BJP या तिन्ही पक्षांचे  २९१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे  जाहीरनामे 

*मैं ना भूलूंगा...मैं ना भूलूंगी...इन रस्मों को इन कसमों को इन रिश्ते नातों को!!!मैं ना भूलूंगा...मैं ना भूलूंगी...*
मित्रांनो...लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत खरंच अप्रतिम आहे. शब्दांना स्वरांसोबतच भावनेचीही जोड आहे. त्यामुळे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक गीत. या गाण्याचे मी नेहमीच रसग्रहण करत आलोय. त्यामुळे या गाण्याला मी फक्त प्रेम भावनेनेच ऐकत आलो आहे. पण आज हे गाणं मोबाईलवर ऐकत असतानाच टी.व्ही. वर मा. पंतप्रधानांचे भाषण दिसले आणि ह्या गाण्याकडे बघण्याच्या माझा दृष्टिकोनच बदलून गेला. एरव्ही या गाण्यात मंत्रमुग्ध होणारा मी... आज मात्र हे गाणं ऐकून मनात वेगळेच विचार यायला लागले. मग या गाण्याच्या शब्दांचा जरा बारकाईने विचार केला. तर त्याचा मराठीत(थोडक्यात)असा अर्थ होतो की - *मी नाही विसरणार... तुला आणि तुला दिलेल्या वचनांना, तुला दिलेल्या आश्वासनांना आणि शपथींना... मी नाही विसरणार आपल्या या नात्याला...* हे सर्व काही त्या गाण्यातील नायक आपल्या प्रेयसीला उद्देशून बोलतोय. तर मित्रांनो थोड्या वेळासाठी आपण त्या नायकाच्या जागी आपल्या नेत्यांना आणि प्रेयसीच्या जागी स्वतःला (म्हणजे मतदारांना) ठेवून बघा...(नेता आणि मतदार यांच्यातील नात्याची कल्पना करा) गाण्याचा पार अर्थच बदलतो... आणि ते गाणं नकोसे वाटू लागते. थोडं हास्यास्पद वाटेल! पण जरा नीट विचार करा. निवडणुकीच्या काळात हे नेते आपल्याकडे मतं मागायला येतात आणि म्हणतात *मैं ना भूलूंगा... इन कसमों को... इन रस्मों को... इन रिश्ते नातों को...* तुम्ही मतदार आमचे मायबाप, दादा, भाऊ, ताई,माई, आक्का वैगेरे... अशी अनेक नाती आपल्याशी जोडतात आणि निवडूण आल्यानंतर मात्र ते आपल्याला चक्क विसरून जातात.
त्यांनी आपल्याला केलेले वायदे, दिलेली आश्वासने, वचने इत्यादी सर्व काही के लोक चक्क विसरून जातात अथवा ते पूर्ण करत नाही.
#उदाहरणार्थ:- २०१४ चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात प्रत्येकी १५-१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. (काँग्रेसने यावर्षी गरिबांना ७२००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे)नंतर निवडणूक झाली. केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने निवडून आले. परंतू मोदींचे ते १५ लाख कुणाच्याच खात्यात आले नाही. यावर नंतर अनेक उडवाउडवची उत्तरे देण्यात आली. अखेर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी "वह एक चुनावी जुमला था" असे वक्त्यव करून या १५ लाखांची कटकट संपवून टाकली. मित्रांनो या प्रकारामुळे पूर्ण देशाच्या जनतेची जाहीर फसवेगिरी आणि क्रूर थट्टा केली गेेली असे म्हणने वावगे ठरणार नाही. कारण १५ लाख रुपये जर सामान्यांच्या खात्यात जमा होत असेल तर गरिबांचे जवळपास ९०% समस्या सुटतील यात काही शंका नाही. या आणि अशाच प्रकारच्या अनेक आश्वासनांनी प्रभावित होऊन भोळ्या - भाबड्या जनतेने भाजपला बहुमताने निवडून दिले. परंतू आज पाच वर्षे होऊनही अनेक आश्वासने पूर्ण करणे तर सोडाच हे नेते चक्क ते विसरून गेले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशाची आणि देशवासीयांची काय अवस्था झाली आहे हे मी सांगण्याची गरज नाही, प्रत्येकाला त्याचा अनुभव आहेच.
तर त्या घटनेला आता पाच वर्षे झाली आहेत. आणि आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुक -२०१९ च्या निमित्ताने तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ते लोक (विविध पक्षांचे नेते) तुमच्या घरी येणार, तुम्हाला नको तेवढा आदर देणार, तुम्हाला विविध आश्वासने देणार, काहीजण तर नोट के बदले वोट मागणार हे सर्वकाही प्रत्येक निवडणुकीला होतंच राहणार. पण मित्रांनो आपण जर प्रत्येकवेळी निष्काळजीपणाने अयोग्य आणि खोटारड्या उमेदवाराला पुन्हा निवडून दिले तर मग झाले आपलेच कल्याण... म्हणून या निवडणुकीत योग्य आणि आपल्या शब्दावर ठाम राहणाऱ्या सुशिक्षित उमेदवारालाच आपले बहुमूल्य मत द्या. तुमचे मत तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला द्या, भाजपच्या उमेदवाराला द्या, बसपा असो, एम.आय.एम असो किंवा आत्ताच उदयास आलेली वंचित बहुजन आघाडी असो... मत कोणत्याही पक्षाला द्या... त्याबद्दल वाद नाही. पण... पण... मत देताना त्या उमेदवाराची कारकीर्द, पार्श्वभूमी, त्याने केलेली कामे, त्याचे शिक्षण, समाजकारण आणि राजकारण यांची असलेली समज, तो गुन्हेगारी अथवा भ्रष्टाचारी तर नाही ना? त्याची विचारसरणी... अशा अनेक गोष्टी स्वतः तपासून पाहा आणि जर तुमच्या बुध्दीला तो उमेदवार खरंच पटत असेल तर नक्की पूर्ण आत्मविश्वासाने त्याला मतदान करा. मग तो भाजप, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी अथवा अपक्ष का असेना... तो तुम्हाला योग्य वाटत असेल तर १००% आनंदाने त्यालाच मतदान करा.
प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या काळात जनतेला आश्वासने देत असतो ते आपल्या छापील स्वरूपात असलेल्या पक्षाच्या जाहीनाम्यात(manifesto)... हा पक्षाचा जाहीरनामा जनतेला प्रभावित करत असतो. जाहीरनाम्यात पक्षाचे धोरण, निवडून आल्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक धोरण अशा अनेक विषयांवर त्यांनी आश्वासने दिलेली असतात. त्यामुळे विविध पक्षांद्वारे प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा एक प्रकारे पुरावा(on paper record) असतो. त्यामुळेच मतदान करण्यापूर्वी या पक्षांचे जाहीरनामे अभ्यासणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षित मतदाराने सर्व जाहीरनामे मतदानापूर्वी जरूर वाचावेत जेणेकरून आपण कुणाला आणि का मत देतोय हे ठरवण्यास मदत होईल. उगाच कोणाच्या सागण्यावरून, कुणाच्या दबावामुळे अथवा अंध भक्तीमुळे कर तुम्ही कुणाला मतदान करत असाल तर याद राखा तुम्ही इतरांना नाही तर स्वतःलाच फसवतायत.
तर आता लोकशाही, शिक्षण, राजकारण, समाजकारण, समता, स्वातंत्र्य, मतदान अशा अनेक विषयांवर संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार लक्षात घेणे याठिकाणी गरजेचे आहे. ते खालीप्रमाणे,
१)" मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीयच"( I am Indian... Firstly and lastly).
*-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(बाबासाहेबांनी धर्म, जात, भाषा यापेक्षा भारतीयत्वाचा पुरस्कार केला आहे.)
२) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(अंधश्रद्धा त्यागून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास बाबासाहेब आग्रही होते.)
३) "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध पिणार तो वाघाप्रमाने डरकाळी फोडल्या शिवाय राहणार नाही."
*-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(बाबासाहेबांच्या या वाक्यावरून आपणास शिक्षणाचे महत्त्व लक्षात येते.)
४) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(आपले मत किती मूल्यवान आहे ते यावरून जाणवते.)
५)"समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(लोकशाही विषयी बाबासाहेबांचे स्पष्ट विचार.)
६) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(बाबासाहेबांनी धर्मापेक्षा माणसाला आणि माणुसकीला जास्त महत्त्व दिले आहे.)
७)"जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(स्वाभिमान आणि स्वातंत्र्य याबद्दल बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार)
८) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्‍या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्‍या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर*.
(वर्णभेदाच्या बाबतीत बाबासाहेबांनी मांडलेले विचार.)
९) "जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार होता है"!
*— डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार)
१०)जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर.एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या...भाकर तुम्हाला जगविल..तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल...
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(विद्येचे मानवी जीवनात असलेले महत्त्व बाबासाहेबांच्या या विचारातून लक्षात येते.)
११) "सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा अंगाठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल..!"
*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
(शिक्षित वर्गाला राजकारणात सक्रिय सहभागी होण्याची गरज बाबासाहेब व्यक्त करतात.)
मित्रांनो मतदान जागृती करण्यासाठी लिहीत असलेल्या या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही काही वाक्ये पुनरुच्चारीत करण्याचा उद्देश एकच आहे की संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही आणि हा देश नक्की कसा असावा याबद्दल त्यांचे विचार सर्व मतदारांर्यंत पोहोचावेत.
(टीप: यात कुणाला जातीयवाद दिसला असेल तर क्षमस्व... हा लेख तुमच्यासाठी नाही.)
तर आता काही प्रॅक्टिकल वर्क करूयात... ज्याने कुणाला आणि का मतदान करायचे हे ठरवण्यासाठी मदत होईल.
१) सर्वप्रथम स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्या. त्यासाठी निवडणूक आयोगाचे #voter_helpline हे ऍप डाऊनलोड करा त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
अथवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
२)तुम्ही मागच्या वर्षी कुणाला मतदान केले हे आठवा. आणि तो उमेदवार निवडून आला असेल तर त्याने काय काय काम केले याचा आढावा घ्या. आणि योग्य वाटेल त्यालाच मतदान करा.
३) #neta
या अँपवर तुम्हाला विविध नेत्यांचे अंदाजे रिपोर्टकार्ड, माहिती, कार्य इत्यादी विविध बाबी मिळतील. हे ऍप डाऊनलोड करा त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
अथवा गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
विविध पक्षांचे जाहीरनामे अभ्यासा. जाहीरनामे खालील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करून प्रिंट करू शकता अथवा मोबाईल मध्येही वाचू शकता.(प्रिंट करून घेतल्यास उत्तम)
४) मतदानादरम्यान काही संशयास्पद हालचाली अथवा गैरवर्तन आढळल्यास निवडणूक आयोगाच्या अँपवर ऑनलाईन तक्रार नोंदवून शकतात. त्याचप्रमाणे तुमची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
#काँग्रेस(राहुल गांधी)*
२) *#भाजप(नरेंद्र मोदी)*
३) *#व्हीबीए (प्रकाश आंबेडकर)*
#काँग्रेस आणि भाजपचे जाहीरनामे यांच्यातील ठळक मुद्दे आणि तुलना पाहण्यासाठी प्रसिद्ध यूट्यूबर #ध्रुव_राठी यांचे अभ्यासपूर्ण व्हिडिओज पाहून शकता.
१) मतदान कार्ड कसे मिळवावे?
२) काँग्रेसचा जाहीरनामा(ठळक मुद्दे)
३) भाजपचा जाहीरनामा (ठळक मुद्दे)
#फेक न्यूज च्या विरोधात पत्रकारिता करणारी प्रसिद्ध वेब पोर्टल:-
२) #altnews
मित्रांनो मतदान नक्की करा...
त्यांच्यासाठी नाही...तर स्वतःसाठी....
या लेखात प्रामाणिकपणे सर्व काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे उद्देश केवळ मतदानासाठी जनजागृती करणे हा असून आपल्याला हा लेख महत्त्वाचा वाटत असल्यास लाईक l शेअर l आणि कमेंट्स कराव्यात..

Tuesday 2 April 2019

The feelings of Teddy....

     इस टेडीबियर को किसी ने फेंक दिया था... अगर उसमें भावनाएं होती हो उसे कैसा लगता? इसे समझाने के लिए मेरी लिखी एक हुई छोटिसी काल्पनिक कहानी... उम्मीद है आपको पसंद आएगी...😊

Photo: 2nd April 2019, Opp. SST College' fountain
   
     बाजार से उसने मुझे बड़े प्यार से घर लाया। मेरे लिए एक अच्छी सी जगह अपने कमरे  दी। वह मेरे साथ बहुत खेलती थी, मुझसे बातें करती थी और मैं बस खामोश रहकर उसकी बातें सुनता था। मैं उसको कुछ जवाब तो नहीं दे पाता था लेकिन उसको पूरी तरह से महसूस करता था। वह मुझे प्यार से मारती थी मुझे उठाकर पटकती थी मुझे बहुत सताती थी लेकिन बाद में प्यार भी करती थी। और मैं बस उसके प्यार में सब कुछ हंसी खुशी बर्दाश्त करता जाता था। भले ही मेरे में जान नहीं थी, पर इतने दिन साथ रहकर ना जाने कहां से मेरे दिल में उसके लिए प्यार जाग गया। लेकिन क्या करता हूं तो मैं एक खिलौना ही ना। लेकिन फिर मैंने सोचा ठीक है मैं खिलौना हूं, मैं उससे प्यार नहीं कर सकता लेकिन वह तो मुझसे बेइंतहा मोहब्बत करती है। मेरा साथ कभी नहीं छोड़ेगी बस यही सोच कर उसे उसके हमसफर के साथ देख कर मैं अकेला जिए जा रहा था।
     एक दिन अचानक उसको क्या हुआ मुझे पता ही नहीं चला। उसने यह कहकर मुझे कचरे के डब्बे में फेंक दिया कि अब या खिलौना पुराना हो चुका है इसकी हमें कोई जरूरत नहीं। उसकी यह बातें सुनकर मुझे बहुत बड़ा सदमा लगा। की क्या यह वही लड़की है जो मुझसे घंटों तक अकेले में बातें करती थी, जो मुझे गोद में लेकर सोती थी, जो मुझसे सबसे ज्यादा प्यार करती थी, जो मुझसे सारी बातें साझा करती थी, मेरे साथ अपना सुख- दुःख बाटती थी, जो हमेशा मुझे साथ लेकर जाती थी। आज न जाने उसे क्या हो गया की उसने मुझे अपने से इतना दूर कर दिया।
    मैं उससे मैं कह नहीं सकता की मुझे अपने से दूर ना करना भले मुझे किसी कोने में रख देना लेकिन तुम्हारे बगैर मैं जी नहीं सकता। काश काश भगवान इस रूई के खिलौने में कुछ देर के लिए जान भर दे और मैं उसे कह सकू की, मुझे अपने से दूर मत करना। लेकिन मैं कमबख्त मै हूं तो एक निष्प्राण खिलौना, मुझ में इतनी भी शक्ति नहीं कि अपने दुख को व्यक्त करने के लिए आंसू बहा सकू। उसने मुझसे पहले बेइंतहा मोहब्बत की फिर मैं भी उसको अपना दिल दे बैठाऔर अब उसने एक झटके में मुझे अपने से दूर कर दिया। अब मेरे जीने का कोई मतलब नहीं रहा जिसको मैं अपना जीवन समझ रहा था उसी ने मुझे ठुकराया। लेकिन कमबख्त मुझ में इतनी शक्ति भी नहीं कि मैं आत्महत्या कर सकू।   अभी फिलहाल दो दिन से में किसी तालाब में यूहीं पड़ा हूं। ना ठीक से जी पा रहा हूं और ना ही मर रहा हूं बस यूं ही उसकी याद में तड़प रहा हूं। सब कुछ खत्म हो गया है बस एक बार उसे देख कर ना जीवन समाप्त करना चाहता हूं।जाते जाते मैं बस इसी सोच में पड़ा हूं की,  ख़ुदा ने इंसान को बनाया और इंसान ने मुझे बनाया। मुझमें तो प्यार की भावनाएं जाग उठी लेकिन इंसान की भावनाएं क्यों मर रही है। अगर इंसान ऐसा ही होता है तो में शुक्रियादा करता हूं उस खुदा का जिसने मुझमें प्राण नहीं दिए। बस अब उसी ख़ुदा से यही दुआ है कि मेरे अंदर के भावनाओं को भी यमराज के पास बुला ले। क्योंकि जब तक मेरे दिल में लिए प्यार है तब तक मैं ऐसेही तड़पता रहूंगा लेकिन मेरा रूई का बदन देखकर किसी को मेरी तड़प भी नहीं दिखाई देगी।
    ऐ ख़ुदा मुझपे एहसान कर और अपने फरिश्तों को भेजकर मुझे अपने पास बुला ले। और उस लड़की को कुछ मत कहना क्योंकि उसके साथ बिताए हुए वह पल इतने हसीन थे कि मैं वह कभी नहीं भूल सकता। उसे लंबी उमर देना उसे खुश रखना बस यही दुआ है मेरी कि वह जहां भी जाए हमेशा बस मुस्कुराती रहें।
                           - तुम्हारा Teddy🐻

New Job New Challanges in New Year 2023

नवं वर्ष, नवं ऑफिस नवा जॉब प्रोफाईल, नवे सहकारी नव्या गोष्टी, नवे चॅलेंजेस बरंच काही नवं, मी मात्र तोच... २०२२ ने भरपूर शिकवलं  २०२३ आणखी शि...